स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका महत्वाचा का वाटतो …?

     

                                                


       सुनंदा  पुष्कर यांच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रीने जीने इथपर्यंतचा प्रवास अतिशय कनखरपणे केला   .... ती  स्त्री केवळ एका पुरुषासाठी आपले जीवन संपवू शकते  …?

         एकटे असून एकटे जगणे  शक्य होते  .... मात्र दुकटे असून एकटे जगणे खुपच कठीण  …! असा माणुस खचत जातो  ....! मग ही  शारारिक  बाब रहात नाही  …! ती मानसीक होते  … माणूस नैराश्याने वेढतो  आणि मग मनाने खचतो  तिथे मग स्त्री असो   वा पुरुष असो तो मग अश्या स्वत:ला  सपंविण्याच्या निर्णयाप्रत पोहचतो  …!!

          तरीही सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतो की   शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका  महत्वाचा  का  वाटतो  …?
         जेंव्हा याचा शोध घेते तेंव्हा मला समजलेली … उमजलेली काही कारणे आपली भारतीय समाज व्यवस्था याला जबाबदार आहे  ! कारण उच्च विद्या विभूषित  … स्वत:चे  एक विशिष्ट  स्थान प्राप्त केलेल्या स्त्रियांना कदाचित पुरुषी स्थैर्याची  गरज नसेल पण ज्या स्त्रियांचे विश्वच त्यांच्या पुरुषाच्या प्रेम, विश्वास  या भोवती वेढलेले आहे त्यांचे काय  …! ज्यांच्या जवळ शिक्षण, आर्थिक स्वावलंबन  सारे आहे  …! पण स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव नाही  … आणि कधी  असली तरी अश्या पुरुषी समाजात एकटे राहण्याचा आत्मविश्वास नसतो  …अश्या स्त्रीया  घरगुती हिंसाचाराच्या शिकार होऊनही कधी सामाजाच्या भीतीने त्याच्या बरोबर रहात असतात   …!  पण  तरीही काही स्त्रीया अगदी सामान्य स्त्रीयाही नवरा गेल्या  नंतर केवढ्या हिमतीने मुलांना वाढवतात  …आणि स्वत:ही जगतात   !   म्हणजे नवरा जिवंत असताना त्याच्या अस्तित्वाला डावलून जगण्याचा  संस्कार म्हणा , भीति म्हणा , या मुळे त्यांची तयारी   नसते  ! आणि म्हणूनच ज्याच्यावर त्या खरे प्रेम करतात म्हणून  … किंवा स्वत:चा स्वार्थ म्हणुनही   (  कोणताही स्वार्थ …) स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष  महत्वाचा  वाटतो  अगदी कुणाच्याही जीवापेक्षा   ....! 

   पण आजकाल ही परिस्थिति बदलत आहे   …! म्हणूनच कदाचित (मुलींकडूनही ) घटस्पोटांचे प्रमाण वाढत आहे  …!

                                                                                                          " समिधा "

माझ्या दैनंदिनीतील एक पान ....… एक विचार .... !!!

                                                                  


प्रत्येक दिवस सारखा नसतो   ....!! गेलेले दिवस, आजचे दिवस आणि येणारे दिवस असे साधे  विभाजन शक्यच नाही   ....! 

आतापर्यंत माझ्या गेलेल्या दिवसांत बरेच दिवसांना सोनेरी झळाळी आहे   .! काहींना दू:खाची किनार , तर काही मनस्ताप पश्चातापाच्या वर्खाने झाकोळलेले आहेत   ! प्रत्येक दिवसाचा स्व:ताचा एक रंग आहे  …!  भाव आहे  …! 

येणारा पत्येक दिवस असेच विविधरंगी असतीलच  … पण एखाद्या दिवसामध्ये एक विशिष्ट गती-चैतन्य  आणि विशिष्ट जीवंतपणा असतो तो प्रत्येक दिवसात नसतो  …!

माझ्या वाट्याला असे चैतन्यमय - गतिशील "दिवस" बरेच आलेत आणि "जो दिवस " असा असतो तो दिवस माझ्या प्रत्येक दिवसाला  ह्याच दिवसाचा जीवंतपणा लाभावा असे वाटल्यावाचून  रहात नाही  …!   

मला माझे जीवन - जीवनातील प्रत्येक दिवस कसा भरजरी पाहिजे,  पण माझी ही इच्छा    अतिशयोक्तीपूर्ण आहे   … पण तो इतका सामान्यही नसावा की ज्यामुळे येणा-या प्रत्येक दिवसातील चैतन्य नष्ट करेल  की काय अशी भीति निर्माण करेल   …  तर  येणा-या प्रत्येक दिवसाला आणि येणा-या प्रत्येक दिवसाने आपल्याला काही ना काही नवसृजनतेच्या रुपात द्यावे जेणेकरून आपली जगण्याची उमेद वाढेल  …! 

मुळातच मला केवळ सामान्य म्हणून जगायचेच  नाही  …  अर्थात असामान्य होण्याइतकी आपली कूवत आहे  की नाही हे समजण्या इतकी मी समंजस नक्कीच आहे   ....!  पण मी माझ्या पुरती एक स्वतंत्र अवकाश नक्कीच निर्माण करू शकेन असा मला  विश्वास आहे  … !!  मनातील प्रत्येक नवसृजनेतेची उर्मी मी दाबणार  नाही  … कारण तीच उर्मी माझ्या  जगण्याचा   … येणा-या प्रत्येक नव्या दिवसाचा एक नवा रंग आणि एक नवा भावनानुभव असणार आहे   .... जगण्याची नवी उमेद असणार आहे  …!  त्या माझ्या प्रकाशतल्या वाटा आहेत  !!

                                                                                           "   समिधा "


२६ जानेवारी … प्रजासत्ताक दिनाची एक सदिच्छा ... खरे अभिवादन......!

                                     

         २६ जानेवारी  … प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे  …! शाळेत असतांना ह्या दिवसांचे मला कोण अभिमान आणि ओढ़ असायची   … कड़क इस्त्रीचे कपडे घालून ताठ मानेने झेंडा वंदन करण्यातील आनंद घेणे मला खुपच आवडायचे   ....  तो दिवस मी स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करुन साजरा करीत असे  …!  आणि संध्याकाळी  मुस्लिम वस्तीत तिथल्या शाळांमध्येही  ध्वजारोहण केले आहे की नाही हे पाहण्यासाठी जात असे  … (बालबुद्धि  …… देशप्रेम,   देशाभिमान व्यक्त करणे  … इतरांचे पारखने  सारेच गमतीशीर होते  …! ) 

   पण पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन  , १५ ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन हे  सुट्टीचे दिवस म्हणूनच अधिक साजरे होउ लागले  …! कॉलजे मध्ये हे दिवस फक्त N. C. C. कैम्प मध्ये साजरे करतात  … !याच दिवसात कुठल्यातरी राजकीय युवा सेनेचे हौशी कार्यकर्ते असतांना शाळांमध्ये जाऊन झेंडा वंदन करीत असे  …! पण पुढे ती संघटना बंद पडली आणि आमचे झेंडा वंदनही  !पण मी सुद्धा ह्या दिवसांचे महत्व कमी केले  होते हे मात्र माझ्यासाठी अक्षम्य आहे   ! 

        आजही भारतीय ह्या दिवशी पिकनिक अरेंज करतात  .... ! आजची सारी धर्मं आधारीत अघोरी प्रेमाची अतिश्योक्ति पाहिल्यावर  … त्याचे राष्ट्र उभारणीवरील , प्रगतिवरील परिणाम पाहता प्रत्येक भारतीयामध्ये अन्य कोणत्याही प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम अधिक प्रखर असणे गरजेचे आहे  असे वाटते   !  

       शाळांमध्ये जसे विद्यार्थी  प्राथर्ना  ,  राष्ट्रगीत  गातात   .... तसेच ते महाविद्यालयातही  आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायलाच पाहिजे   .... ! पण  तसे ते राष्ट्रगीत गान सक्तीचे केले नसल्याने  शाळेतून महाविद्यालयात आल्यावर मात्र हे राष्टप्रेम कमी होत नसले तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी होते  … ! भारताच्या  प्रत्येक भावी पिढीतील   राष्ट्रप्रेम  हे इतर कोणत्याही प्रेमा पेक्षा अधिक  प्रखर व्हायला पाहिजे   …!!! तरच २६ जानेवारी  .... १५ ऑगस्ट हे दिवस फक्त राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे दिवस रहाणार नाहीत  …!तर सीमेवर लढणा-या सैनिकाप्रमाणे सतत हे राष्ट्रप्रेम  जागृत असावे  … सतर्क असावे  …! राष्ट्रपेक्षा काहीच महत्वाचे नाही  …!  प्रत्येकाचे  आपले धर्मं आचरण केवळ आणि केवळ राष्ट्रहीतासाठीच असावे  …! राष्ट्रपेक्षा कुणीही मोठा नसावा   ....!  राष्ट्र   ....  देश   … आहे  म्हणून आपण आहोत  ....!!! 

         आज भ्रष्टाचार मोठा झाला आहे   !  आज कटटर धर्मांधता  मोठी झाली आहे  …! दहशतवाद मोठा झाला आहे  .... आज पैसा मोठा झाला आहे  ....!! आणि आज माणुस , माणुसकी , पर्यावरण , सा-या सा-याचा हळुहळु -हास होत आहे  …!!!  राष्ट्रप्रेम प्रखर करा   … राष्ट्र वाचवा   आणि  हेच यावर उत्तर आहे  सीर सलामत तो पगड़ी पचास  राष्ट्र वाचला तर आपण वाचू  ....! आपले अस्तित्व राष्ट्रामुळे आहे  …! धर्म , संस्कार ,संस्कृति , परंपरा  ह्या राष्ट्रिय स्तभांचे स्तोम माजविण्या पेक्षा पर्यावरण-हास , भ्रष्टाचार,अत्याचार, दहशतवाद, बेकारी,गरीबी ,  परकियांची  घूसखोरी  या संघर्षासाठी साठी  मैदानात येण्याची गरज आहे  …! प्रत्येक राष्ट्रभक्ताने  आपापल्या परीने थोडासा खारीचा वाटा उचलावा  ....!!! हीच  सदिच्छा  ....! आणि हीच आपल्या  स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना खरे अभिवादन ठरेल  ....!!! 

                                                                   
                                                                                                                 
                                                                                                            समिधा 







लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......