आशेला नवे पंख फुटु दया ........!

     मनाला नवे पंख फुटले की माणूस स्वप्नांच्या अवकाशात स्वत:ला झोकून देतो आणि कल्पनातरंगाची अनेक वलये तो आपल्या भोवती वेढून घ्यायला लागला कि नकळत तो स्वत:पेक्षा या दिवास्वप्नामध्येच अधिक गुंतायला लागतो   .... !!स्वप्नं भंगली की  मन निराश होते   …। आणि ते मग सर्वांमध्ये असूनही अलिप्त राहायला लागते   … शरीर बोलत असते पण मन   .... मात्र कुठल्यातरी नकळत्या कोप-यात एकटेच विचार तंद्रित भरकटत दूर   .... जात असते   …! पुन्हा पुन्हा ते समोरच्या वास्तवात येण्याचा प्रयत्न करीत असला तरी निराशा तसे करू देत  नाही  .... !  अश्या निराश मनाला स्वत:भोवती गोळा  करण्यास  बरेच प्रयास पडतात  .... आणि असे मन थकून भागुन  परतले कि , समोरच्या वास्तवाशी त्याचे नाते तुटलेले असते वास्तवाचे मन तो पर्यन्त दूर गेलेले असते  …!

     कधी कधी  हे निराश मन  … दुस-या मनाचा आधार घेते  … त्यावेळी दुस-या मनाने  सांत्वन करणे  त्याला त्यावेळी हवेहवेसे वाटत असेल तरी सुद्धा त्याला ते मन  कितपत समाधान देईल हे परिस्थिति प्रकृतिवर अवलंबून असते   …। कदाचित हे दूसरे मनही  निराश मनासारखे समदुःखी असेल तर साथ सोबतीने  वाटचाल करण्यास त्याना आनंदच होत  असतो  … ! पण दोघांचा प्रवास नव्या आशावादाकडे होत नसतो  …!!

                                 


    म्हणूनच  मनासारखे आशेलाही नवे  पंख फुटू शकतात  ....! एकीकडून निराशा झाली पण दुसरा मार्ग खचितच मोकळा असतो  …!  फक्त तो आपण सतर्क व्यापक दृष्टीने शोधायचा असतो  …! कारण अनेक मार्ग आपल्या समोर असतात हे काहीअंशी  खरे असेल तरी आशेला नवे  पंख फुटल्यावर सर्वच मार्ग सुकर वाटतात   … आपलेच वाटतात   …! म्हणूनच आशेला नवे   पंख फुटु दया  .... ! त्या पंखानी आपण आकाशावरच स्वार  होण्यास सज्ज होणे  म्हणजे खरा आशावाद आहे  ....!

                                                                                               "समिधा "





धर्मांतर …!!!!!

    मला अतिशय आनंद होत आहे की , … "हिंदू धर्मा " विषयी आजच्या हिंदुस्थानी तरुण  पिढीचे विचार किती  प्रखर आहेत  …! तरुण पीढ़ी आपला  "हिन्दू धर्म म्हणजे नेमके काय ? याचा अतिशय अभ्यासपूर्ण आकलन करुन… आज आपला धर्म -ह्रास पावत आहे , हिंदूंचे धर्मांतर होत  आहे    … हे पाहून   … नुसती पेटून उठली  आहेत  ……! 

        मला माझ्या हिंदू  असण्याचा प्रचंड अभिमान आहे  ....! कारण  हिन्दू धर्म  हा याच्या त्याच्या विचारांची आदान प्रदान करून  निर्माण झालेला नाही  " हिंदू धर्म  ' स्वयंसिद्ध" , "स्वयंभू" आहे  . ! "हिन्दू धर्माचे प्राचीन नाव "वैदिक धर्म " आहे  . म्हणजेच वेदांवर आधारलेला धर्म ! वेद  हे सम्पूर्ण जगातील प्राचीनतम ग्रंथ  आहेत   ! वेद  म्हणजे हजारो मंत्रांचा संग्रह ! आणि ज्यांना  ते उत्स्फूर्तपणे स्फुरले,दिसले, शोध लावला  … त्यांचा साक्षात्कार करुन  घेतला आणि  ज्यांच्या मुखातून प्रकट झाले,त्यांना आपण  "ऋषी"  म्हणतो   !   

   मुळात "धर्म " म्हणजे जगण्याची , जगवण्याची एक निति, आचरण  …!  "हिन्दू धर्मात अध्यात्माला-धार्मिकतेला  ( कर्म कांड  नव्हे ) अनन्य साधारण महत्व आहे  …! आणि जिथे धार्मिकता येते , अध्यात्म येते तिथे सहिष्णुता , बंधुता , प्रेम, मानवता येते   …! आणि तोच खरा हिन्दू धर्म  आहे  .!  ज्याच्या ठायी  हे सारे आहे तोच खरा "हिंदू "    !  स्वामी विवेकानंद  यांनीही "राष्ट्रीय एकात्मता " साधायची असेल तर विखुरलेल्या अध्यात्मिक शक्तींचे एकीकरण करावे लागेल    … ! आपण सारे अध्यात्मिक वृत्तीचे झाल्याशिवाय भारताचे पुरुजजीवन होणार नाही  .!  एवढेच नव्हे तर  यावर सर्व जगाचे हित आहे  .!  असे सांगितले आहे   !

     आपल्या हिन्दुस्थान वर अनेक परकियांची आक्रमणे झाली  …! त्यामुळे अनेक संक्रमणे झाली   … आणि तरीही आपला हिन्दू धर्म अजूनही अभेद्य आहे  …! त्याने अनेक नव्या धर्माना   एक विचार दिला  .! जगातील सर्व धर्मांचा "पाया" हिन्दू धर्म आहे   …!  आणि म्हणूनच प्रत्येक धर्मात "ईश्वराची" व्याख्या , त्याच्या पर्यंत  पोहचन्याचा मार्ग एकच सांगितलेला  आहे   ! 

       आज अस्तित्वात असलेला प्रत्येक धर्म आप आपल्या चांगल्या वाइट पद्धतीने आपला धर्मं वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे   …! पण  तो कसा आणि कशासाठी याचा शोध  कोणी घेतला आहे का   …?  "श्री कृष्णाने  धर्मयुद्ध घडवले   ....! पण  ते कोणा  विरुद्ध   ....?  ज्यांच्याशी धर्मयुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला "गीते चे " दिव्य dnyaan, तत्वदन्यान्   दिले  …  ते कोण होते   .... ? कोणत्या धर्माचे होते   ....?  श्रीकृष्णाने नेमक्या कोणत्या धर्मासाठी धर्मयुद्ध केले  …?   त्या  महायुद्धात , धर्मयुद्धात जे लढले   … मारले गेले  … ! ते एकमेकांचे पिता, बंधू , सखा होते  …!  "गीते मधील वर्णन असे आहे "पृथ्वीतलावर एकूणच धर्माचा -हास होउ लागला   . नीति नियम सोडून आसुरी वृत्ति वाढली    . अत्याचार वाढला   । तेंव्हा श्री विष्णुना " श्रीकृष्णाच्या रुपात अवतार घ्यावा लागला   …! 

        आज जगातील वाढलेल्या  त्याच अत्याचारी , आसुरी, निर्दयी शक्तींचा, वॄत्तिंचा  नाश करायचा आहे  ....! न कि कुठल्याही धर्माच्या असुयेने ,मत्सराने दंगली, युद्ध करून   विशिष्ट पंथातील-धर्मातील निष्पाप माणसांचा, अबालवृद्धांचा नाश करायचा    …!  हिन्दू धर्माचा  …अर्थात "हिन्दू धर्मात अवघ्या मानव जातीच्या कल्याणासाठी कोणते विचार दिले आहे त्यांचा प्रसार करा  …! आपल्याला  विचारी हिन्दू हवेत   …अविचारी "जिहादी" नकोत    …! आपला हिन्दू धर्म डोळस असावा आंधळा नको  ! जबरदस्तीने , लोभाने , भीतीने , अनीतिने हिन्दू धर्मं  स्वीकारणारे  हिन्दू अनुयायी नकोत   …! आपल्याला अंत:करनाने  हिन्दू झालेले हिन्दू हवेत   ....! " स्वामी विवेकानंद " यांनी  जगभर आपल्या हिन्दू धर्माचा जो डोळस प्रचार केला   …! तसा प्रचार करणे   आजच्या तरुण पिढीचे परम कर्तव्य  आहे  …!  हिन्दू धर्म नेमका काय आहे याचे खरे स्वरुप काय आहे हे जगाला  सांगून पटवून दया  .!   शिवाजी महाराज परकियांशी  लढले तसे नीतिनियम तोडणा-या स्वकीयांनाही त्यांनी  सोडले नाही  …! श्रीराम यांनी   "रावणाशी   धर्मयुद्ध केले" पण  एका  स्त्रीच्या  आपल्या पत्नीच्या स्वाभिमानसाठी  ....! ते  रावणाच्या आसुरी शक्ति विरुद्ध लढले   …! रावणाचा सख्खा भाउ विभीषण श्रीरामा कडून लढला  !    … का  .......? 
           
              आज प्रत्येक खरा हिन्दू पेटून उठणारच   .... कारण  त्यांच्या धर्मात दिलेल्या नीतिनियमांचा। -हास होत आहे   …! हे त्याला पहावत  नाही  … पण  त्याचा -हास रोखायचा असेल तर  मुळात आपण परकियांचे अंधानुकरण करणे  थांबविले पाहिजे   …! आपली परंपरा , संस्कृति, संस्कार, ह्या आपल्या घरापासून जपल्या पाहिजेत  …!  दु स-यांना  सांगण्या आधी स्वत: त्यांचे आचरण करा  ....! आधी करा नंतर बोला  ....!  हिन्दू धर्मं प्रत्येकाच्या श्वासा श्वासात पाहिजे   … ! आपल्या भारतीयांची ती  ओळख आहे ! आणि ही आपली ओळख जगात कुठेही गेलात तरी सांगायला, दाखवायला लाजु नका  …! चला उठा हिन्दू धर्म वाचवा  …! हिन्दू धर्म वाढवा   ……! हे विचार खुप मवाळ वाटतील   …! पण जर आपल्या हिन्दुस्थानवर  कोणत्याही दुस-या जिहादी किंवा अन्य  शक्तिनी आक्रमण केले तर प्रत्येक हिन्दुस्तानी त्याच्यावर तुटून पडलाच पाहिजे  …! मग तिथे मला" गांधी निती " नको" स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिन्दुस्तानी राष्ट्रनीति पाहिजे " …!!!

          
                                                                                                     " समिधा "







" साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव..........."!!!

     सासवड येथे ८७ वे साहित्यासमेलन  श्री  . फ. मु. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भरत आहे  … या पार्श्वभूमिवर मला १९९६ साली "आळंदी " येथे ६९ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाण्याचे भाग्य  लाभले भाग्यच म्हणावे लागेल   .... कारण त्या नंतर झालेल्या प्रत्येक साहित्य समेलन म्हणजे साहित्य संमेलनचा खर्च , अनुदान  आणि त्यांचे राजकारण हेच गाजत  असते    …!!  या पार्श्वभूमीवर मी अनुभवलेले हे साहित्य समेलनाचे महत्व साहित्य पंढरी म्हणजे काय हे  अधिक अधोरेखित करणारे आहे …! या साहित्य पंढरीची मला एक साहित्याची वारकरी होण्याचे भाग्य लाभले  ... त्या साहित्य समेलनातील काही मनोहारी , काही रंजक, विनोदी काही विचार करायला लावणा-या अश्या अनुभवांचा आनंद माझ्या मित्र मैत्रिणींना देण्यासाठी हा प्रपंच   …!  आशा आहे तुम्हाला वाचून आनंद मिळेल   ....!!!
                                      

     १ फेब्रुवारी  ११९६ रोजी आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आळंदीत जोरदार तयारी सुरु होती   …! संमेलनासाठी येणा-या साहित्य प्रेमींच्या स्वागतासाठी अलंकापुरी सज्ज झाली होती  …!! कवियत्री "शांता शेळके " अध्यक्ष असणा-या व "लता मंगेशकर " उद्घाटक असणारे हे  संमेलन "इंद्रायणीच्या " तीरावर १५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या "अलंकापुरित " चार दिवस होणार होते  . मुख्य मंडपास "संत dnyaandev  मंडप " तर कविसंमेलन मंडपास संत मुक्ताई मंडप नाव देण्यात आले होते ! ग्रंथ प्रदर्शनासाठी २५० स्टॉल उभारण्यात आले होते … ! मुख्य मंडपात एकावेळी ३० ते ३५ हजार रसीक बसु शकतील अशी व्यवस्था होती  मंडपात क्लोज सर्किट टीव्ही बसवण्यात आले होते   ....! अश्या या साहित्य संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलन, कीर्तनादि कार्यक्रमांची आमच्या सारख्या रसिकांसाठी पर्वणीच होती  .  

     अश्या या अलंकापुरीला मी माझ्या मैत्रिणीनी ३१ जानेवारीला  ला प्रयाण केले   …! या साहित्य पंढरीला जाण्यापूर्वी मी माझ्या गुरु , शिक्षिका यांची  भेट घेऊन  आशीर्वाद मार्गदर्शन घेतले…! माझ्या साठी हा अत्यंत भाग्याचा  दिवस होता   …! मी प्रथमच साहित्यातील माझ्या  देवांना प्रत्यक्ष पाहणार होते , ऐकणार होते  . 

    पुणे म्हणजे साहित्याचे (विशेषत: मराठीचे) साहित्यिकांचे माहेरघर  . अश्या या साहित्याच्या माहेरघरी  अगदी प्रथमच जाण्याची संधी या संमेलनाच्या निमित्ताने मिळाली   . साहित्य संमेलन १ फेब्रु , १९९६ ते ३ फेेेेब्रु पर्यंत होते   . आम्ही मैत्रिणीनी ३१ जानेवारीला पुण्याला  वस्ती केली , त्यापूर्वी प्रथम आळंदीला  जाऊन  रहाण्या-खाण्याची सोय  करून  आणि साहित्य संमेलन प्रतिनिधि म्हणून प्रवेशपत्र  मिळवून पुण्याला संध्याकाळी ७.३०  ला पोहचलो  …!

      पुण्याच्या वास्तव्यात आणि प्रवासात पुणेरी माणसांच्या अनेक वैशिष्टयांपैकी माझ्या निदर्शनास , अनुभवास आलेली काही वैशिष्ट्य अशी   …(इथे माझ्या पुणेकर मित्र-मैत्रिणींच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतु नाही   . दुखावल्यास क्षमस्व) )

       समुद्रात राहून /पाहुन ओलं न होता बाहर पड़ता येईल  …? कोरडे रहाता येईल  …? साहित्याच्या माहेरघरी आश्याही व्यक्ति भेटल्या ज्यांना साहित्य - साहित्यिक  याबाबत अजिबात उत्सुकता किंवा कुतूहल जाणवले नाही  .! या व्यक्ति म्हणजे (ज्यांच्या पुण्याच्या घरी आम्ही राहिलो होतो ते  माझ्या मैत्रिणीचे मामा  जे पुण्याच्या "न्यू इंग्लिश स्कूल" मध्ये सायन्स टीचर आहेत आणि तिचे दोन मामे भाऊ आनंद-मकरंद   .  या तिघानाही आम्ही मुंबईहून (पुण्याच्या वक्रदृष्टीने) ख़ास आळंदी च्या साहित्यसंमेलना साठी आलो आहोत हे पाहूनच गंमत    ....  वाटली !  त्यांच्या मते साहित्यिक गोष्टी म्हणजे सगळा काल्पनिक खेळ ! सायन्स वाल्यांना पूर्ण सिद्धांतिक वास्तव आवडते  . असा विचार जरी  करीत असले तरी तो त्यांचा किंवा त्यांच्या वैचारिकतेचा दोष नाही तर एकूणच विचार प्रवृतितिल एक कमतरता आहे एवढेच म्हणू शकते  . 

     पुण्याची माणसं ताटात किंवा ताटातील एकहि शीत खाली न पडू  देण्याची जितकी काळजी घेतात तितकीच काळजी ते समोरील व्यक्तीचा एकही  शब्द खाली न पडण्याची घेतात  .  थोडक्यात हाताला हात न भीड़वता अक्षराला अक्षर भिडवून अहिंसात्मक वादामारी करतात   …!!  'आम्ही शिवाजीनगर -(कॉर्पोरेशन) येथून आळंदी बस मध्ये चढलो  .  आमच्या जवळ खुप सामान , त्यामुळे सर्वांच्या आधी बसमध्ये सीट मिळवण्या साठी पळत  सुटलो   …पण सर्वांच्या शेवटी बस पर्यन्त पोहचलो  …! अर्थात बसमध्ये  सर्वात शेवटची सीट मिळाली   .!! 
    आमच्या अगदी  पुढच्याच सीटवर दोन  मांजरीं मध्ये उंदराने बसावे (पु   . ल  . चे  वाक्य  ) त्याप्रमाणे दोन अवजड स्त्रियांच्या मध्ये एक पुरुष बसला होता  .!    काही अंतराने कुठलेतरी बस स्थानक आले खिड़की जवळची स्त्री उतरली तीच संधि साधुन तो मधला पुरुष खिड़कीजवळ सटकला .... ! परंतु  …। त्यांच्याच सीटजवळ तितकीच वजनमापाची स्त्री सीटच्या आशेने उभी होती  … ती बसलेल्या स्त्रीला सरकायला सांगत होती  .... पण बसलेली स्त्री ढिम्म   ....!! " अहो बाई ! जरा सरकायताय का   …?  उभी स्त्री  .  "नाही बाई ! मला नाही सरकायचं   " बसलेली स्त्री  .  (मुंबईच्या लोकल डब्यात एखादी बाई सीट वरुन उठली कि शेजारचीचा सरकने हा हक्कच असतो, त्यासाठी भांडण, मारामा-या होतात ! इथ सगळे  वेगळे होते )  "मग मला आत तरी जाउ दया   .... " उभी स्त्री   . "मग जा की  .... " बसलेली स्त्री  .  त्या तेव्हढ़याश्या अरुंद जागेतुन  ते रुंद शरीर महत्प्रयासाने ओढत , ताणत  ती उभी स्त्री बसण्याचा प्रयत्न करीत असतानाच  … बसलेल्या स्त्रीच्या मांडीवर बसली ! (नशीब त्या  खिड़कीतल्या माणसाचे) अहो बाई ! रिकामी जागा दिसत नाही का  …? "दिस्तीय म्हणून तर  बस्तिय , तुम्ही सरकत नाही , रिकाम्या जागेवर बसु देत  नाही ! मग करायच काय  …? (शेजारचा मनुष्य भेदरून खिड़कीच्या कनपटीत  अधिकच घुसत होता  …!  हातातलं  सामान कसंतरी सीट खाली चेपित ती  स्त्री बसली पण तोंडाचा पट्टा चालूच  … "रिकाम्या जागेत बसावं  तरी मेलं यांची शिरजोरी ! एक  ना  दोन  .  या संपूर्ण प्रसंगात कुठे तरी वाद घालायला कारणीभूत ठरलेले एकतरी सयुक्तिक कारण "बसतं " का ?

      कुठल्याही प्रश्नाचे (अगदी तो प्रश्न सरळ साधा असला तरी) पुणेकरी माणूस त्याचे उत्तर सरळ  देईल याची काही खात्री नसते   .! आळंदीला आम्ही प्रथमच जात होतो आमच्या ओळखीच्या बांईनी आम्हाला दिलेला पत्ता शोधण्यास आम्ही बसमधूनच प्रारंभ केला आमच्या जवळच एक आळंदीकर वयस्कर गृहस्थ बसले होते   … त्यांच्या पासूनच सुरुवात केली   .   "काहो   … इथे आळंदीला मराठा धर्मशाळा कुठे आली" मी  . .... …? अहो  ! इथं ब-याच धर्मशाळा आहेत  . घर न्हाई एकवेळ सापडणार पण धर्मशाळा जागोजागी पेरल्यात ) ( आम्ही विशिष्ट नावासकट प्रश्न विचारला होता पण उत्तर सरळ नाहीच   …! "बरं पाण्याची टाकी कुठे आली  ? " आम्ही  . "आता तुम्हाला नेमकी कुठची टाकी पायजेल  ?" म्हणजे आगरी धर्मशालेजवळची की खालच्या मुंबईच्या जेवण डब्यावाल्यांच्या धर्म शालेजवळची  …?" (मघाशी विशिष्ट नावासह  धर्मशाळेचं नाव विचारले तरी उत्तर नाहीच  …! अश्या या पुणेरी वल्ली  .... !! पण  काहीही असो   चुकणा-याला शाल जोडितला मारुन कान पिळून शिकवणी घेण्याची जी रीत असते ती  वाखणलिच पाहिजे…! ही एक पुणेरी पाटी पहा  ....... !

                                               

    एकदाचे आम्ही आमच्या धर्मशाळेच्या मुक्कामी पोहचलो "मराठा धर्मशाळा " तिचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असलेली एक इमारत होती  . त्यातील एका खोलीत आमची रहायची व्यवस्था झाली  . आधीच पुणे ते आळंदी  प्रवास करून थकल्या भागलेल्या आम्ही आल्या आल्या जमिनीवर बैठक ठोकल्या   . पोटात भुकेचे कावळे आक्रोश करीत होते   .  शेवटी खोलीच्या मागच्या बाजूलाच पाण्याचे एकमेव नळ होता  . ( तिथे २४ तास पाणी होते  …! ) त्यावर हातपाय धुवून आम्ही पुण्याहून आणलेल्या नाष्ट्यावर  अक्षरशा तुटून पडलो  .   ताजेतवाने वाटू  लागले  आणि आम्ही इंद्रायणी तीरावर १५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या "अलंकापुरीकडे" प्रस्थान केले ! त्या रम्य संध्याकाळी रस्त्याने जाताना आमच्यात  अगदी एक वेगळेच चैतन्य संचारले होते  .   आम्ही त्या साहित्य नगरीतील "अलंकापुरीमध्ये उत्साहानेच  प्रवेश केला प्रवेश बैच लावून आम्ही प्रथम सारी  अलंकापुरी फिरुन  येण्याचे ठरविले  .

     प्रवेशद्वारावरच अनेक दिग्गज साहित्यकांचे तैलचित्र गुंफून जणू तोरण लावले होते  .  आम्ही मुख्य मंडपात आलो  … जिथे गानसम्रादनी " गानकोकिळा " लता मंगेशकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार होते  . त्यास "संत dnyaandev मंडप "  नाव देण्यात आले होते  . तर कवी-कवितांच्या सोहळ्या साठी उभारण्यात आलेल्या मंडपास "संत मुक्ताई" नाव दिले  होते  .  आम्ही सार्वजणी मंत्रमुग्ध होऊन साहित्य नगरी फिरत असतानाच टाळ -मृदंगाचा आणि लेझिमचा आवाज कानी आला  .  प्रवेशद्वाराजवळ ग्रंथदिंडीने प्रवेश केला होता   .!  या दिंडित सहभागी होण्यासाठी नेवाश्याहुन  dnyaaneswharinchi , देहू तून तुकारामांच्या गाथेचि व सज्जनगडावरून दासबोधांच्या गाथेचि पालखी आणण्या  आली होती  . ! प्रत्यक्ष साहित्य समेलनापूर्वीची ही पूर्व संध्या म्हणजे उद्याच्या साहित्य पंढरीमधील साहित्य भाव भक्तीचा मेळा कसा रंगणार होता त्याची नांदी होती  … ! रात्र झाली होती  । आमच्या मुक्कामी आम्हाला जायची इच्छा नसतांना   … आम्हाला या भारलेल्या वतावरणातून जावे लागत होते  .! दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे कधि पळाला आम्हाला कळलेच नाही  …! दुस-या दिवशी पहाटेच उठायचे होते   …! सकाळी ७ वाजता या अलंकापुरित परत यायचे आहे या आनंदातच आम्ही आमच्या मुक्कामी पोहचलो  …!

      पहाटे पाचला  आम्ही सा-या उठून साडे सहां पर्यंत तयार होऊन सकाळच्या त्या रम्य गुलाबी थंडीत चालतच "अलंकपुरीकडे " निघालो  … ! अर्थात प्रथम dnyaaneshwaranchyaa  समाधीचे दर्शन घेतले  … ! खुप पवित्र पवित्र वाटत होते  .! आणि ज्या सोहळ्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो देखणा सोहळा आम्ही याची देहि याची डोळा पहिला   …!!  साहित्य समेलनाच्या उद्घाटनाचा ५५० बाय ३०० फुट आकाराच्या "संत dnyaandev मंडप  या मुख्य मंडपात समोरील फुलानी सजवलेल्या व्यासपीठावर भव्य-दिव्य व्यक्तिमत्व बसली होती   .! त्यामध्ये संमेलनाच्या अध्यक्षा श्रीम  . शांताबाई शेळके , गानसम्रादनी श्रीम  . लताबाई मंगेशकर ,   मावळते साहित्य संमेलन अध्यक्ष श्री  . विद्याधर गोखले आदी मंडळींना मी तर  अगदी  विलक्षण नजरने अगदी भारावल्या सारखी बघत होते  .  आमच्या सारख्या साहित्य वेड्या रसिकांसाठी  ती आमची दैवत .......!!!!                          

                                    


     आतापर्यंत लतादीदींना गाताना एकले /पाहिले होते पण त्यावेळी प्रथमच काहीतरी वेगळं एकायला आणि पहायला मिळाले   .  त्यांचे भाषण म्हणजे "पसायदान" वाटले  .  लयबद्ध , शब्दप्रधान , सुरताल  आपोआप गुंफीत  जाते ती कविता   .... असा काव्यात्मकतेचा अनुभव प्रत्यक्ष पहायला  … ऐकायला  मिळाला  .  त्यानंतर साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीम शांता शेळके यांचे भाषण म्हणजे ओजस्वी वाणी  आणि तेजस्वी भाषाशैलीचा दुग्धशर्करा योग होता  .  या सर्व भारावलेल्या मनस्थितीतच आम्ही दुपारनंतर धर्मशाळेत आलो  .  थोड़ी विश्रांती घेऊन संध्याकाळच्या ख़ास कार्यक्रमासाठी आम्ही उत्सुक होतो   .... संध्याकाळी तयारी करुन  आम्ही इंद्रायणी तिरावरून साहित्यनगरीकडे निघालो होतो   …… ! मी कुतूहलाने इंद्रायणीला बघून घेतले   .... कारणही तसेच ख़ास होते   .... !!

     साहित्यनगरीत आम्ही प्रथम गेलो ते पुस्तकपंढरीला भेट दयायला १० बाय १२ फुट आकाराचे सुमारे २५० पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते  .  तिथे प्रवेश  केला  ....  आणि मला अलिबाबाच्या गुहत शिरल्या सारखे भान हरवून आधाशा सारखी पुस्तकांच्या जत्रेत स्वत:ला झोकून दिले  .  अनेकविध पुस्तकांमध्ये मी एवढी हरवून गेले कि होते कि प्रतिभा आणि वीणा या माझ्या मैत्रिणी  माझ्यापासून कधी  दूर गेल्या मला कळलेच नाही  …!!! रात्रीचे जवळ जवळ आठ वाजले असतील पुस्तक खरेदी करुनही माझी त्या पुस्तक जत्रेतुन बाहेर पडण्याची अजिबात इच्छा नव्हती   … तेव्हढयात पाठीमागुन प्रतिभा आणि वीणाने पाठीत जोरात धपाटे टेकले    ………  मी भानावर आल्यासारखी  त्यांच्याकडे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले  . त्या बिचा-या  दोघी मला शोधून शोधून दमल्या होत्या  शेवटी कंटाळून धर्मशाळेकड़े परतत असताना  अचानक त्यांना मी मंडपात सी सी टीव्ही  बसवण्यात आले होते त्यामध्ये मी या पुस्तकांच्या स्टॉलवर दिसले म्हणून बरे  ……!!


     मुख्य मंडपाच्या बाहेर आम्ही आलो  आणि अचानक मला इंद्रायणी  तिराची आठवण झाली   .... आणि जवळ जवळ ओरडतच इंद्रायणी तिराकडे धावत सुटले  .... कारण इंद्रयाणीकडे जायला आम्हाला आधीच खुप उशीर झाला होता  .... !! दँयानेश्वर  माऊलींनी नऊ हजार तेहतीस ऒव्यांनी ड्यानेश्वरीची रचना केली  . त्या अनुषंगाने संमेलनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सूर्यास्त नंतर इंद्रायणी नदीत नऊ हजार तेहतीस dnyaandip सोडण्यात येणार होते  ……!!  आम्ही गर्दीतून वाट काढत तेथे पोहचलो  .... आणि समोरचे दृश्य बघून हरखून गेलो  .... !!

     रात्रीच्या अंधारात हजारो दीप मिनमिनत्या प्रकाशात पाण्यात हेलकावे घेतानाचे दृश्य अतिशय विलोभनीय दिसत होते  ....!! इंद्रायणीच्या काळ्याशार पाण्यावर  दीपकळ्या जणू उमलल्या होत्या।  त्याचे वर्णन शब्दातीत आहे   ……!!!
                                        

     दुस-या दिवशी आम्ही संत dnyaneshwar माऊली उत्तमेश्वर पिंपरीकर यांचे कीर्तन आयोजीत करण्यात आले होते  .   त्यावेळी १२ जण  एकाच वेळी पखवाजावर त्यांना साथ देत होते आणि सुमारे दोन हजार टाळकरी त्या तालावर कीर्तनात् रंग भरत होते  .  तो नाद्ब्रंम्हाचा एकत्रित गजर ऐकून अवघी आळंदी दुमदुमुन गेली   ....  आणि तो मुख्य मंडप अवघ्या पंढरीमध्ये रूपांतरित झाला   …!!

     दुस-या दिवशी आम्ही "dnyaneshware रचिला पाया " या परिसंवादाला हजेरी लावली  … तेथे  राम शेवाळकर , यु . म. पठाण , आणि शिवाजीराव भोसले   .... या दिग्गजांचे विचार आणि ते व्यक्त करण्याची शैली   आम्हाला बरेच काही देऊन गेली   ....!!!  तेथेच तेथेच आम्हाला श्री   . माधव गडकरी , शिरीष पै  आणि वीणा देव , सुधीर रसाळ भेटले अर्थात आम्ही आमच्या ऑटोग्राफ  डाय-या त्यांच्या पुढ्यात सरसावल्या   .... त्यांच्या  स्वाक्ष-या  अजूनही मी एखाद्या मोरपिसा सारख्या जपून ठेवल्या आहेत   .
                                                         
     मी माझ्या घरी संध्याकाळी फोन करत होते , त्याप्रमाणे रात्री फोन केला  .... काल फोनवर माझ्या बाबांनी मला अर्जंट घरी परत बोलविले होते  .... कारण मला  गव्हर्नमेंट नोकरीचा इंटरव्यू  कॉल आला होता  … मुलाखतीचा दिवस नेमका ४ फेब्रुवारी होता , म्हणजे मला  साहित्य संमेलनाचा शेवटचा तीस-या दिवसाचे कार्यक्रमांचा आनंद घेता येणार नव्हता  …!  मी बाबांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला  की  मी कंटाळले आहे इंटरव्यू देऊन  .... ,  मला  नाही यायचे  ....! मला वाटले बाबांचा आग्रह कमी झाला असेल  आणि मला उद्या परत जावे लागणार नाही  … ! पण  …  बाबांनी उद्या तू घरी परत ये असे फर्मानच सोडले   … मग माझाही नाइलाज झाला  .  उद्याचा साहित्य संमेलनाच्या शेवटचा दिवस  दुपार पर्यंतचे जमतील तेवढे सर्व कार्यक्रमाना हजेरी लावण्याचे मात्र ठरविले होते  …! त्याप्रमाणे नवोदित कवींचे काव्यसंमेलन , पुन्हा        एकदा पुस्तक स्टॉलला भेटी हे कार्यक्रम आटपुन् घेतले  ....!  खरंतर संध्याकाळचे सर्वात सुंदर आणि आवडते कार्यक्रम होते   …! "पंडित भीमसेन जोशी " यांचे "अभंगवाणी"  आणि हृदयनाथ मंगेशकर यांचे "अमृताचा घनु "  या कार्यक्रमातील या दिग्गजांच्या स्वर्गीय आवाजातील गायनाचा आनंद याला मात्र मी मुकणार होते  …!!

     पण  तरीही मी दोन दिवसात जो आनंद उपभोगला तेहि नसे थोड़के  …!

                                      " स्वर्गसुखाचे भोगासी
                                       तीर्थाची तुलना काय होई
                                       तीर्थ म्हणजे आनंदभु ठायी ठायी"   ....!!!

असेच काहीसे भाव घेऊन मी एकटीच परतले  …!! तरीही आळंदी  साहित्य संमेलनातील माझा एकूण अनुभव काय  …? तर अनेक लहान मोठ्या , असामान्य - सामान्य - अतिसामान्यांच्या सहवासातील एक अलिप्त - एकांगी सहवास  …!! ज्या अपेक्षित क्षणांच्या आशेने गेले होते  "त्या" क्षणांपेक्षा अधिकतर अनपेक्षित क्षणांची ओंजळ भरून  आणली   …!  परिसंवादात - वाद-विवाद दिसले, सुसंवादात फक्त एकांगी संवाद दिसला , सहभागापेक्षा उपभोग दिसला , आनंद-खुशीपेक्षा हौशी दिसल्या  … या साहित्य सोहळ्यात अश्या या ब-याच मोकळ्या जागा दिसल्या   …!

    मी स्वत: मात्र काव्यसंमेलनातील सुन्दर - सुबोध कवितांचा आनंद घेतला   .  परंतू निमंत्रितांच्या कवितांपेक्षा नवोदितांच्या कविता मला अधिक भावल्या   ! परंतु त्यातही सुकाळाच्या नवोदित कवींच्या भाऊगर्दीत बरे झाले  आपण नाही असे वाटल्याशिवाय राहिले नाही ! .  पण साहित्यसंमेलनाचा  एकूणच अनुभव मनाला समाधान देणारा नसला तरी एका नवीन अनुभवाची माझ्या जीवनात भर पडली आहे याचेच मला खुपच समाधान वाटले   ....!!

     "मित्र-मैत्रिणींनो त्याहून विलक्षण चमत्कार म्हणजे ज्या मुलाखतीसाठी मी माझा साहित्यिक आनंद अर्धवट सोडून परतले होते    .... त्या मुलाखतीत मला जवळ जवळ सर्वच प्रश्न आळंदी येथे भरलेल्या साहित्य संमेलनावरच  विचारले गेले   .... हां विलक्षण योगायोग होता  की माऊलीची कृपा  .... माहीत नाही पण मला govt नोकरी मिळाली  …!!!!!


                                                                                        " समिधा"


   
                                   




" माझे बाईपण "...................




कवयित्री पदमा गोळे यांची एक कविता वाचनात आली....! "आजच्या इतकी आईपणाची भीती वाटली नव्हती. अगतिकतेची खंत कधीच दाटली नव्हती" ....!  कवितेतील या काही ओळी वाचताना आजही  स्री आणि तिची भीती यांचा संदर्भ बदललेला नाही ....! दिल्लीतील आणि त्यानंतर सातत्याने स्रीयांवरील अत्याचारांच्या घटना आपण वाचतोच आहोत.  ज्या स्रीयांवर  हे अमानुष अत्याचार झालेत त्यांच्या दुख:वेदनांशी आपण कल्पनेतही भिडू शकत नाही....! आपला सामाज स्रीयांबाबत एव्हढा असंदेनशील कसा राहू शकतो?
अनादी -अनंत काळापासून कधी द्रौपदीच्या रुपात विटंबना तर कधी सीतेच्या  रुपात स्री पवित्र्याच्या सत्वपरीक्षेचे आव्हान अश्या    विकृत समाजपुरुषाच्या   मानसिकतेचे स्वरूप पहायला मिळते ....! आणि आजही हि विकृत समाजपुरुषाची  मानसिकता बदलेली नाही ..!
स्री पुरुष विषमता हा एक व्यापक विषमतेच्या वास्तवा मधला सर्वव्यापी घटक आहे. यापलीकडे विषमता पेरणारे घटक आहेतच धर्म , जात शिक्षण पैसा असे अनेकविध घटक आहेत. आणि प्रत्येक घटकातहि आपल्या परीने आहे रे नाही रे , थोडे वरचे  आणि थोडे खालचे स्तर आहेत या प्रत्येक स्तरावर स्रीयाना संघर्ष करावाच लागतो....! स्री  दुर्बल आहे...! असे फक्त समाजपुरुष ओरडतो ...! आजची स्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषी मक्तेदारी असलेल्याही प्रत्येक क्षेत्रात  कार्यरत आहे...!  परंतु तरीही स्रियांचा त्यांच्या मतांचा , त्यांच्या विचारांचा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा किती विचार केला जातो....? 
आजच्या २१ व्या शतकातही स्रीयांपुढे  स्रीभ्रून हत्या ,हुंडाबळी, लैंगिक शोषण, घरात- बाहेर मानसिक,शाररीक अत्याचार या आणि अश्या अनेक समस्या उभ्या आहेत...! ग्रामीण भागातील स्री तर आपल्या हक्कांबाबत अनभिज्ञ आहे . कर्त्या पुरुषाच्या बरोबरीने ती कष्ट करते पण तरीही तिला आर्थिक स्वातंत्र्य नाही...! निर्णय स्वातंत्र्य नाही...! तिला तिच्या मुलभूत गरजापासून वंचित ठेवले जाते..!

हि परिस्थिती बदलणे गरजेचे आहे....! या साठी सनातन भारतीय संस्कृतीचे पालक सांगतील मग स्रियांनी ७ च्या आत घरात यावे...! पूर्ण  कपडे घालावेत..! फक्त चूल आणि मुल सांभाळावे......! तर हे सर्व थोतांड आहे.....! बलात्कार करताना ती लहान मुलगी आहे कि म्हातारी स्री  आहे  हे बघितले  जाते का ...? तिचे वय ...तिचे कपडे या नगण्य गोष्टी आहेत..!  तिचे फक्त बाईपण बघितले  जाते ...! तेंव्हा  कुठे जाते तुमचे संस्कृती..? 
 मुळात संपूर्ण समाज्पुरुशाची विकृत मानसिकताच बदलली पाहिजे. स्रीला माणूस म्हणून वागवा ..! बरोबरीने तिचा सन्मान करा ...! कारण स्री -पुरुष हे समाजाची केवळ दोन चाके नाहीत , तर निसर्गाची दोन सूत्र आहेत ज्यावर समस्त मनुष्यजातीचे अस्तित्व अवलंबून आहे...!  आणि याचे भान समाजपुरुषाला येणे आवश्यक आहे...! विकृत समाजापेक्षा सुसंस्कृत समाज निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी पाश्च्चात्य संस्कृतीच्या नावाने जे अंधानुकरण चालले आहे या
बाबत ओरड होते.. हे काहींअंशी खरे असले तरी आपली भारतीय संस्कृतीचे डोळस भान ठेवून पुरुषी मानसिकता आणि त्याहूनही विकृत मानसिकता बदलली पाहिजे....! 

माझं  बाईपण बघा ...
पण 
मी जोजविते विश्वाला ....
माझं आईपणही बघा ....!!!! 


                                               "समिधा" 

" गुंतता ह्रदय हे " ......!!

    
                                     


      काही माणसांना आपण आपल्या आयुष्यात खुप महत्व देतो   . त्यावेळी आपण हे असे का करतो   ….? ही माणसे आपण आपली मानतो , कारण आपल्याला स्वत:ला कुठेतरी हे जाणवत असते , कधी कधी त्याचा प्रत्ययही घडलेला असतो की आपल्या आयुष्यात त्याना जेवढे महत्व आहे तेवढेच मलाही त्या व्यक्तिच्या आयुष्यात महत्व आहे   . मग आपल्यातील हे आपलेपण त्या व्यक्तीला अनेक त-हानि पटवून देतो  अगदी प्रामाणिकपणे  .  सुरवातीला आपली ह्या प्रमानिकतेबाबत त्या व्यक्तिकडूनही तितकाच आणि तसाच प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा नसतेच ….! पण ही अवस्था फार काळ नाही टिकत   …!

     कारण ह्या आपलेपणाचा हळुहळु आपल्या नकळत एक मानसिक गुंता होंत  जातो  . हळुहळु आपण आपलेपण त्या व्यक्तीवर ठसविण्याच्या प्रयत्नात लादण्याचा प्रयत्न होंत जातो  .  सुरवातीला त्या व्यक्तिकडूनही आपल्याला प्रतिसाद मिळतो अगदी तेव्हढ़य़ाच उर्मितुन आणि ऒढीतुन पण जसे "अति परिचयात अवदन्या"  अश्या तर्हेने या अति आपुलकीने , ओढाळ  मनाला कुठेतरी शह बसतो आणि ती  ओढ हळुहळु खूंटत जाते   ! हे खूंटणे त्यावेळी एकाचवेळी दोघांच्याही किंवा एकावेळी एकाच्याच लक्षात येते त्यावेळी त्यांच्यातील आपलेपण कुठेतरी थरथरते आणि मग ते तुटक तुटक होते व् नंतर कदाचित ते कायमचे लोप पावते  …!!

    असे घडण्याची दोन  कारणे असू शकतात एक म्हणजे हे आपलेपण  नेमक्या त्या क्षणी पालवी धरते ज्याक्षणी कोरड्या मनाला कुठूनतरी ओलावा लाभतो  ….!  पण पुढे हीच पालवी म्रुगजळाने  आभासाने फुललेली असते असे लक्षात येते  ….!

     आणि दुसरे म्हणजे ज्यावेळि प्रेम-जिव्हाळा , आपुलकी आपला हक्क सांगू लागते त्यावेळी जबाबदारिचा  विसर पडलेला असतो  .   त्याचवेळी दोनही व्यक्तिमधील अहं सदैव जागा असेल तर तो या आपुलकिच्या हक्काने आधिक जोपासला जातो  आणि त्यामुळे तो अहं अधिक दाट , गडद , गहिरा , ठळक  होउन ज्या आपुलकीने त्याना जवळ आणलेले असते त्याचाच  नाश करत  जाते  …!! आणि गैरसमजाना अधिक पेव फूटते  ….!  असा हा गुंता /तेढा  वाढत गेला की मग नात्याचा आपोआपच अंत होतो   ….!  


                                                                                               " समिधा "












                                                                                                                        



     


"वळण"

                                        
     इतर प्राणीमात्रांपेक्षा माणूस प्राण्याचं सगळच वेगळ -आगळ असतं  .  जगण्याच्या प्रवासात चढ़ उतार येतात आणि वळण  आले की वळावेही लागते  . अश्यावेळी मागचं विसरून  समोरच्याला जाऊन भिड़ावं लागतं   …. !  आता माणसांमध्ये स्त्री -पुरुष ह्या नैसर्गीक भेदांमध्येहीं एक आगळेपण दिसते  . वळनांची ची ज्यावेळी आपण चर्चा करतो  त्यावेळि ही चर्चा स्त्रियांच्या जीवनप्रवासाचा विचार करता अधिक चिंतनीय तर होइलच पण खात्रीने करमणुकिचेही ठरेल  .   

     स्त्रीच्या जीवनात अनेक वळनं  येतात  .  पहिलेच वळण तिच्या जन्माबरोबरच येते  . तिच्या आईच्या जीवनात  .  (ती ही एक स्त्रीच) कारण मुलगी जन्माला येणे म्हणजे जिची सर्वाना  जबाबदारी उचलायची आहे … ! आणि मुलाचा जन्म म्हणजे जो सर्वांची जबाबदारी उचलतो (वंशाचा दिवा )   …! अश्या  सामाजिक धारणेत तिचा जन्म होतो आणि तिच्या पूर्ण जीवन प्रवासाची वळनं तिथेच निश्चत होतात  …!

     आई , बहिण, मुलगी अश्या नात्यांच्या गुंत्यातिल वळनांवर चालताना तिला त्यांच्याच प्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचा आकार उकार घडवावा लागतो  .  (तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविण्यासाठीही तिला पिता,बंधू  अथवा पति यां सारख्या पुरुष सत्ताक सामाजिक रचनेच्या चौकटीत  राहून घडवावे लागते ) . 

     सर्वात मोठे वळण तिचे लग्न होते तेंव्हा   …. माहेरी या स्त्रीचे एक वेगळे व्यक्तिमत्व तयार झालेले असते  . ज्यावर तेथील माणूस प्रक्रुतिंचे प्रभाव पडलेले असतात  आणि लग्नानंतर पूर्णत: वेगळ्या वातावरणात. निराळ्या माणूसप्रक्रुतिच्या माणसामध्ये तिला स्वत:ला सामावून घेणे आवश्यक असते.  या सामावन्यात प्रयत्न एकतर्फी ठरतात तर  कधी अपुरे पडतात आणि मग अश्यावेळि संघर्ष निर्माण होउ शकतात   . आणि हे सर्वात धोकादायक वळण आहे.  या वळणावर तिला आघात होउ शकतो, अनेक ठेचा लागू शकतात  …!

     ज्या वळनावर तिला स्वत:च्या स्वत्वाला विसरून दुस-याना आपले मानलेले असते  अश्याच्या सोबतीने (जिथे फक्त विश्वासबळावर ती स्वत:ला सोपवित असते /झोकुन देते   ….!) आपल्या जिवनाचे पुढचे वळण कोणतेही असेल तरी आपण आता एकटे  नाही या विश्वासावर ती निर्धास्तपणे जगण्यास सीध्द होते. … !!

     अश्या ह्या पदोपदी वळण घेत चालना-या स्त्रीला समाज नेहमीच मुलीला चांगलं "वळण"   असावं असा आग्रह धरीत असतो  …! (समाजपुरूषाला अजुन कोणत्या चांगल्या वळनांची आवश्यकता वाटते …?) स्त्रीकडून समाजाला खुप अपेक्षा आहेत  … ! पण सर्व अपेक्षाच्या केंद्र स्थानी फक्त पुरुषसत्ताक प्रवृतिला पोषक असे तिचे वळन  पाहिजे.!

     अशी वळणा वळणाच्या गुंत्यात अडकलेली स्त्री म्हणुनच एक आगळे  -वेगळे    सदैव दुभंगलेले  व्यक्तिमत्व  आहे असे वाटते  ….! 


                                                                                                                "समिधा" 
     
     

     

आजचा समाज कुठे चालला आहे …. ?

    

                            


     आजचा समाज कुठे चालला आहे  …. ? जुन्या पारंपारिक नितिमुल्याना चिकटून बसलेला समाज आजच्या यंत्रयुगात माणसाच्या मनात संघर्षच निर्माण करीत आहे  .  माणसाचा माणसावरचा विश्वास उडत चालला आहे  . भोगवादाच्या आणि वासनेच्या नशेचं प्रमाण वाढत आहे   . जुनी नैतिक मूल्य जोपासली जात नाहीत  .  पैशाला अवास्तव महत्व आल्यानं कुठल्याही नितिमुल्यांची चाड  न बाळगता तो मिळवण्याच्या मागे माणूस धावत आहे  . भावभावनांनाही बाजारी स्वरुप   येत आहे की काय असं वाटत आहे  .  

     यंत्राला मन  नसतं , अगदी संगनकावरही हुकूमत चालते ती माणसाची  .  जो पर्यन्त माणसाच्या मनाची जागा यंत्र घेऊ शकत नाही तोपर्यन्त माणसाची मन:शक्ति सर्वश्रेष्ठच राहणार  .   म्हणुनच मला वाटते की माणसाच्या प्रेमभावना , वात्सल्यभावना आणि स्नेह्भावना जपनं आवश्यक आहे  .  या भावनांचे  बंध  गुंफणारी  नवी मूल्य आणि त्यावर आधारलेला समाज व कुटुंबव्यवस्था निर्माण करणे अधिक निकोपपणाचे ठरेल  असे वाटते  …! 


                                                                                                                   " समिधा "
     
     
     

"जन्मलेल्या प्रत्येकाला " ................!!



एखाद्याचा जन्म दुस-या जन्माशी बांधलेला असतो तेंव्हा आईच्या उदरातुन जुळि भावंड जन्माला येतात …!
पुढ़ेही ती मानसिक रित्या अशिच जुळलेलि रहातात की नाही हा प्रश्न क़ाळाकडेच सोपविणे ईष्ट  …!

    काल घरी परतताना गाडीतिल चर्चेतुन समजले की ठाण्याला कामाला जाणा-या  एका २० -२१  वर्षाचा मुलगा गाडीतून वाकल्यामुळे बाहेरचा खांब लागुन पडला …. आणि त्याच वेळी लेडिज डब्यात बसलेल्या त्याच्या मैत्रीणीने गाडीतून उडी मारली …! (कदाचित ते एकमेकाना पहाण्याचा प्रयत्न करीत असावेत )आणि अश्याप्रकारे एक प्रेमकहानी संपली  …!! तिचा शेवट असा व्हावा  …?

     कालच मी प्रीया तेंडूकरांचे "जन्मलेल्या प्रत्येकाला " या पुस्तकातील "एकेका कथेचे एकेक शेवट " ही ललित लघुकथा वाचली  . प्रत्येक माणूस हा स्वतंत्र कथाबिज घेउन जन्माला येतो त्याचे आयुष्य एक त्याच्याही नकळत ओघात ओघवती घडत जाणारी कथा असते   …. ! तो त्याच्या कथेचि सुरुवात त्याच्या मर्जिप्रमाणे करतो … !(खरे तर या बाबत मतमतांतरे असू शकतात )पण त्या कथेचा शेवट अपेक्षेपेक्षा वेगळाच घडतो  ….!

   काल मी एकलेल्या घटनेतील प्रेमी  …. त्यांची ती "कथा "   'तो'  आणि 'ती ' दोघानी जन्म एकावेळि घेतला नाही  .  पण त्यांच्या प्रेमाची सुरुवात त्यांच्या मर्जिने झाली असेल , त्यांचे असणे एकमेकांसाठीच होते  . त्यानी कितीतरी एकत्र स्वप्ने पहिली असतील , त्यांचा जन्म विभक्त होता पण त्यांचे  जुळणे  मात्र "मृत्युच्या बिन्दुला येउन मिळाले होते  ….!

    त्या दोघांच्या  मिलनाची  " सम"  त्यांच्या एकाचवेळीच्या मृत्युपाशी  लागली  ….! ती "एकवेळ " त्यांच्या मिलनाची "मात्रा " होती …!!  त्यांचे जीवनगाणे /युगुलगाणे या पहिल्या मात्रेपाशीच संपावे  का  ….? त्यांच्या प्रेमकहाणीचा हाच शेवट  ….?  गाण्याच्या समेलाच दोघां गाना-यानी उडून जावे …? आणि हा त्यांच्या कथेचा शेवट  त्यानाही ठाउक नव्हता …!

     जन्मलेल्या प्रत्येकालाच आपल्या कथेचा शेवट  माहीत नसतो …! जन्मलेल्या प्रत्येकासाठी स्वत:चेच जीवन एक  "गूढ़ "कथा असते  …… ! आणि आपण जगत असतो म्हणजे काय करीत  असतो  …? आपल्याच जीवनाचे "गूढ़" उकलत असतो   …! पण या बाबत आपण अनभिद्न्य असतो  …. ! आणि या अद्न्यानातच सुख असते  ! आणि म्हाणुनच जीवन "सुन्दर आहे "  ….!!!!


                                                                                                                    "समिधा"


बलात्कार …बलात्कारी ......!!!!!

                                               
     काहीही करून आज आपण हा सिनेमा पूर्ण  पाहायचाच  …! गेल्या पंधरा वर्षात आपण  हा सिनेमा पूर्ण पाहूच  शकत नाही  …. का …?  पण आज  पाहायचाच असा मनाचा निश्चय  करुनच टिव्ही समोर  बसले 
घरात अर्थात माझ्याशिवाय कुणी नव्हते …. ! सर्व दारं खिडक्या नीट बंद केल्या आणि मनाचा हिय्या करून 
मी टिव्ही समोर  सिनेमा पहायला लागले  …… !

     आणि  जस जसा सिनेमा पूढे सरकत होता, आणि तो विशिष्ट सीन येण्याची वेळ जवळ  येत होती तस तसा माझा माझ्या मनावरिल आतापर्यंतचा ठेवलेला   ताबा सुटायला लागला  … माझ्या छातीत धडधड सुरु झाली  …कितीही कंट्रोल करीत असतांनाही डोक्याला झिनझिन्या येउ लागल्या होत्या  . आणि तो सीन सुरु झाल्या बरोबर आपोआपच माझे अवसान गळाले  …आणि मी रिमोट्चा ऑफ बटन दाबले  …. !!मी पुन्हा एकदा "तो" सिनेमा अर्धवट सोडला होता  …!!!

     "तो " सिनेमा म्हणजे   "बैंडिट क्वीन "  जो मी आजही पूर्ण पाहू शकत नाही  "फूलनदेवी " या एक सर्वसामान्य मुलीचा  "बैंडिट क्वीन"दरोडेखोर होण्या पर्यन्तचा जीवन प्रवास हा या चित्रपटाचा विषय आहे .आजही  या चित्रपटातील  "तो " बलात्काराचा सीन पहायची हिम्मत माझ्या जवळ नाही  …!  पण हल्ली तर रोज सकाळी उठल्या पासून एक नाही तर अनेक  "स्त्री" वरील लैंगीक अत्याचाराच्या बातम्या ऐकुन मनाच्या 
संवेदना भेदरून जात आहेत .आज एक स्त्री म्हणून विचार करताना स्त्रीच्या शरीराची चाललेली  वीटम्बना कशाचा परिपाक आहे ….?

     एका बाजुला एकविसाव्या शतकाच्याआगमनाचे ढोल वाजवीत नव्या संगणक आणि युगाच्या पहाटेची वाट पहात आहोत ….!  विलक्षण प्रगत  अश्या तंत्रयुगाच्या आगमनाची वाट पहात आहोत  .   स्त्रीया  आज शिकत आहेत  …. शिकवित आहेत  …!भारता सारख्या अतिपारंपारिक देशात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नवनवीन क्षेत्रं पादांक्रात  करीत आहेत,  पण तरीही …पण तरीही प्रश्न उरतोच  …"आजची आधुनिक स्त्री खरंच "माणूस " म्हणून संपूर्ण समाजाकडून स्वीकारली गेली आहे  …?

     अजुनही स्त्रीचे "वस्तुपण" संपलेले नाही  . तिच्यावरील अन्याय अत्याचाराचा तपशील बदललाय   … !पण त्यामागचे पुरुषीमन तेच आहे .  कदाचित अधिक विकृत झालेलं  आहे …. !म्हणुनच  समाजातील पुरुषी विचारसरणी , मानसिकता महाभारत कालिनच आहे  . आजच्या दिल्ली , मुंबई मधील  बलात्काराच्या घटना कशाच्या द्योतक आहेत  … ! महाभारतात द्रौपदी , ययाति पुत्री माधवी यांच्यावरील पुरुषी वर्चस्वाच्या कहाण्या सर्वश्रुत आहेत  ….! आणि आजही कितीतरी द्रौपदी, माधवी  यांचे शील हरन  केले जात आहे . स्त्रीमनाचा आणि तिच्या भोवतीच्या वास्तवाचा कुणीतरी , कधीतरी वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे का  …. ….? जेंव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार करून तिच्या शिलाचा , तिच्या कौमार्याचा भंग केला जातो तिची ती पीडा कोण लक्षात घेते  ….? स्त्रीवर असा घृणास्पद अत्याचार करणा-या पुरुषाची मानसिकता ,  ह्या क्रौर्य मनाचा पोत पुरुष मनच ओळखू शकतात  …! कारण स्त्रीची शील हरना नंतरची नव्हे ती  शील हरना  पूर्वीची मानसिकता मी  तो "बैंडिट क्वीन " सिनेमा पहात असताना अनुभवली आहे  …! तर प्रत्यक्ष असा घृणास्पद प्रसंग ज्या दुर्दैवी स्त्रीवर गुदरला  आहे  …. तिच्या मनाची पीड़ा कशी असेल  …???  स्त्रीच्या कौमर्याचे लचके तोड़नारे ही गिधाड़ेच आहेत ….!   स्त्रीच्या मनाची आणि देहाची विटंबना  करणारे हे नरभक्षक आहेत।  समाजात एकुणच समाज व्यवस्थेत स्त्रीचे चारित्र्यहनन करणे या इतकी सोपी गोष्ट नाही।       "स्त्री म्हणजे पैर की जुती "  किंवा   स्त्रीचे शील म्हणजे काचेचे भांडे  …. एकदा तडकले की परत सांधता येत नाही …"  हे या समाज व्यवस्थेतील स्त्रीयांबाबतीतिल अलिखित नियम आहेत  ….!  याच पुरुषी मानसिकतेतुन स्त्रीला नेहमीच दुबळ समजुन दाबलं आहे  … !  "भोगाची वस्तु " हेच तिचं मूल्य आणि समाजव्यवस्थेतील स्थान होउ पहात आहे  …!   आजकाल स्त्रीयांवरिल  अत्याचाराच्या घटनांमधे  ल क्ष णिय वाढ झाली आहे  .  परत एकदा स्त्री घराच्या उंबरठयाआड़ लपून राहिली  तरच ती  " सुरक्षित " अशी स्थिति या विकृत समाजाने स्त्रीवर आणली आहे  … !

  " स्त्री"आदिम काळा पासून स्वत:च्या केवळ "स्व" साठी  नाही तर स्वत:च्या मन्युष्यवत  अस्तित्वासाठी लढत  आहे।   तिने आजही हक्क ओरबाडून मिळवले नाहीत तर  स्त्रीत्वाच्या सर्व परिसीमा भेदुन पुरुषी सामर्थ्याच्या सर्व शक्यतां  पर्यन्त स्वत:ला सिध्द करून  मिळवले आहेत. ….! मग "संभोग " हाही तिचा स्वत:चा हक्क का असू नये…? तिथेच मात्र तिला घरी दारी हक्क नाकारला जातो . माणुसपणाच्या पुढाकारान  कधीच का घडू नये  संभोग … !  या विकृत समाजाकडून तोच तिचा हक्क ओरबाडून घेतला जात आहे ….!! तिचे लचके तोडले जात आहेत ….!  

     खरे तर  या देशातल्या सर्वसामान्य माणसाला स्त्री-पुरुषांना ख-या अर्थाने समानतेच्या जगात आणण्यासाठी आवश्यक ती मानसिकता , शैक्षणिक    आणि आर्थिक पात्रता प्राप्तच होउ नये  अश्या  दिशेने सगळा प्रवास चाललेला दिसतो . त्यामुळे कायदे ,  आयोग असोत की प्राचीन काळापासून चालत आलेली स्त्री गौरवाची सुभाषिते असोत, यांचा कितीही वर्षाव झाला तरी स्त्रीची परिस्थिति प्रत्यक्षात किती बदलली  …?बदलते?

     पण संघर्ष अटळ आहे.! आणि तरीही नदी,धरती ,आग, हवा ही सर्व स्त्री रूपं आहेत ,  शतकानुशतकांच मौन मोडून जेंव्हा ती  आक्रोश करतील तेंव्हा "भोगण" या शब्दाचा आविष्कार काय असतो त्याचा प्रत्यय सा-या जगाला येइल आणि त्याच दिवशी जगाला कळेल पुरुष प्रधान व्यवस्थेत काय अर्थ असतो "स्त्री" असण्याचा आणि का व्याकुळ होते  मन जेंव्हा तिचं माणूसपण  अमानुषपणे नाकारलं जातं आणि केवळ शरीर भोगलं  जातं  …! आणि त्याच दिवशी रुजतिल समाजात तिच्या विषयीच्या आस्था , दृढ़ता , प्रीती ,  आशा  , निष्ठा , प्रार्थना ,  वेदना  आणि  उदारता  …!!!! कारण …….

                                                                   "स्त्रीच   आई  आहे ,
                                                                     सावित्री  आहे ,
                                                                     राधा आहे,
                                                                    आणि दुर्गाही  आहे  ……!!!!!

                     

                                                                                                                         " समिधा"


                                         

          न भूतो न भविष्यति अशी रुपयाची घसरण झाली आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्यांपासून अगदी लक्ष्मीपुत्रांना अर्थात उद्योग धंदे व्यापा-यानाही सोसावा लागतो आहे  . 

          सर्वांना ओबामा यांची भारत भेट आठवत असेल त्यावेळी अमेरिके पुढे आर्थिक मंदी , बेरोजगारी हे प्राधान्याने मोठे प्रश्न होते  . त्यावेळी अतिशय मुत्सद्दीपने बराक ओबामा यांनी भारतातील उद्योगपतिंना , कारखानदाराना आर्थिक गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले आणि आपल्या सरकारला "भारत" हां भविष्यात जगातील आर्थिक महासत्ता होणारा  देश आहे " अशी गाजराची  वाजवून चांगलेच झुलवुन आपली झोळी भरून गेले आणि आज "कुठे भारत आणि कुठे गेली आर्थिक महासत्ता "

         भारताने आंतरराष्ट्रीय खुली बजारपेठेचे धोरण स्वीकारुन सर्वानाचा भारताची बाजारपेठ उपलब्ध करून 
दिली  .   आज भारतात भारतीय बनावाटिच्या वस्तुंनी बाजारपेठ काबिज केलि आहे. भारतातील प्रत्येक सन समारंभातिल वस्तु चीनी आणि त्याचा पहिला ग्राहक भारतातील फेरीवाले विक्रेते। … आणि अशी आर्थिक घूसखोरी कुणी   ? आणि कशी रोखायाची ? 
     आपला भारत देश हा "शेतिप्रधान देश आहे" अशी फक्त घोषणा  राहिली आहे आज आपण लसून, बटाटा , गहू पाकिस्तान आणि  आयत करतो  ….! 
     
. संगणक , मोबाइल ,  टी . व्ही  . यामुले जग जवळ आले आहे। …. पण त्याबरोबर आपल्यातील "भौतिक गोष्टींची" व्यसनाधीनता वाढते आहे   . आणि त्याचाह फायदा अमेरिके सारखी तंत्रदद्यानी राष्ट्र घेत आहेत  . 

           भारताची पर्यटन व्यवस्था पार कोलमडली आहे. आज उच्च मध्यमवर्गीय लोकही (श्रीमंत लोक तर परदेशातच खरेदी करतात) परदेशात फिरायला जायला लागले आहेत  . भारतीयाना सोन्यामधील गुंतवनुक अधिक सुरक्षित वाटते।  आणि भारतीय एकुणच संस्कृतीचा  तर ते सोने हे भारतीयांचे केवल गुंतउकिचे साधन नाही तर ते  एक अविभाज्य अंग आहे. पश्चिमी देशांत असे महत्व सोन्याला नाही। पण त्यामूले सोन्याची आयात वाढली आहे  . पण त्यासाठी सरकारने गोठवलेले सोने बाहर काढने गरजेचे आहे।   
"भ्रष्टाचार"  हा तर  कलिचा प्रश्न आहे. कोट्टयवधीचा काळा पैसा भारताबाहेर आहे. तो भारतात येणे आवश्यक आहे. "ग्लोबलायझेशन " वाढले पण त्याबरोबरच रुपयाचे "डिमोशन" मात्र झाले। 

          रुपयाची किंमत सुधारायची असेल तर परत एकदा "गंधिजिनी" दिलेला "स्वदेशिचा नारा " भारती यांमधे  जागवन्याची   गरज आहेच … ! जस्तिजास्त गुंतवनूक भारतीय उत्पादनात करून भारताला आधुनिक तंत्रदद्यानाची जोड़ देने आवश्यक आहे। . 

     आपल्यातील राष्ट्रीय अस्मिता जागवा   …! स्वदेशी वापरा रुपया वाचवा  …. ! 

         

     

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......