वडापाव...!

 
 

       एक म्हातारे तरतरीत आजोबा रोजच छान स्वच्छ पांढरा धोतर सदरा घालून ठाणे रेल्वे प्लैटफॉर्मवर असतात. ट्रेन येते प्रवासी चढतात...ट्रेन सुटायला काही अवधी असतो. तेवढ्यात ते आजोबा खिडकीजवळ येतात...हात पुढे  करून माय वो एक वडापाव वडापाव, एक  वडापाव वडापाव करीत याचना करतात..
समोरच एक फास्टफुडचे कैन्टीन असते मला त्यांची दया आली.. मी एक वडापाव १२रू. मिळतो तेवढे पैसे खिडकीतूनच  त्यांच्या हातावर ठेवले. माझ्या मनात आले भिकारी असूनही
किती टापटीप स्वच्छ आहेत. असं कसं? की घरी दुर्लक्षीत म्हातारं माणूस असेल?म्हणून
घरच्यांच्या नकळत इथे येऊन अशी भीक मागत असतील...? पण खायला न देण्याईतके
हाल करीत असतील? मला त्यांची अजूनच  दया आली! मी अगदी काकुळती नजरेने
त्यांच्याकडे पहात होते .... एवढ्यात मला  माझी मैत्रीण दिसली मी तिच्याकडे गेले
तिच्या शेजारी बसून बोलत असतांना .....माय वो वडापाव वडापाव ... वडापाव वडापाव...
मी खिडकीकडे पाहिले ..…... तेच आजोबा परत  दुस-या खिडकीजवळ येऊन तितक्याच आजर्वाने भीक मागत होते.... मी स्तब्धच!  माझी मैत्रीणीने लगेच पर्समध्ये हात घातला.
मी तिला थांबवलं ! काय आजोबा एकावेळी  किती वडे खाता पोट बिघडेल तुमचे ! आजोबांनी माझ्याकडे न कळून पाहिले ! आणि लगेचच पुढच्या खिडकीत तेच पुन्हा वडापाव वडापाव ......!!

      संध्याकाळी घरी परतांना बदलापूर  स्टेशनच्या जीन्यावर एक कळकट म्हातारी आजी....
माय वो तोंडाकडे हात नेऊन भुक लागली करत समोर हात पसरले...! मी दुर्लक्ष करीत
खाली उतरले समोरच वडापावची गाडी एक प्लेट वडापाव घेतले आणि पुन्हा जीना चढत
असतांना विचार आला ती आजी तिथे असू दे नाहीतर हे वडापाव मलाच खावे लागतील...
ती आजी तिथेच होती, तिच्या हातात वडापाव  दिला तीने दिलेले तोंडभरून आशिर्वाद घेऊन
जीना उतरले मागे वळून पाहिले ती पुन्हा तोंडाकडे हात नेऊन भुक लागली करत
हात पसरत होती ...! 

माणसाला नेमकी भुक कशाची असते अन्नाची  की पैशाची ....?

* समिधा

" देव आणि देवपण.......!"


 
' देव ही एक केवळ संकल्पना आहे
आणि ' देवपण ' हे त्या संकल्पनेचे
मूर्त स्वरुप आहे   ...!
देवपण म्हणजे चमत्कार नव्हे   ....!
देवपण म्हणजे ईष्ट अनिष्टाची जाण आहे   ...!
देवपण म्हणजे शांत निरामय
क्षमाशीलतेचा भाव आहे  ...!
देवपण म्हणजे सदैव प्रेम माया लळा
यांचा अविरत वाहणारा स्रोत आहे   ....!
देवपण म्हणजे कर्तव्या प्रति भक्ति
आणि लोकांप्रति सहयोगाची आसक्ति
या आणि अश्या सा-या भावभावनांनी
युक्त असा आपली कर्म करतो  तो
देवपणाला पोहचतोच  .....!
मग ' देव '  आहे की नाही ....?
हा प्रश्न नगण्य ठरतो   .....!
म्हणूनच देव माहित होण्या साठी ,
प्रथम ' देवपण ' समजून घेणे  जास्त महत्वाचे आहे   ....!!

                  श्रीकृष्णार्पणमस्तु    ......!!


                                                                         ' समिधा '

" तुझसे नाराज नहीं ..... मगर हैरान हूँ ...!!"



Image result for AAMIR KHAN IN LAGAAN

 

   "आमिर खान" पर्फेक्टनिस्ट  ! माझा अगदी कॉलेज पासून रोल मॉडेल आहे.  आणि माझा रोल मॉडेल किती परफेक्ट होता हे जसजसा काळ पुढे जात होता तस तसे सिद्धही होत होते. दिवसेंदिवस त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर वाढत होते   ...! त्याचे एका पेक्षा एक सुंदर अर्थगर्भ आणि मनाचा वेध घेणारे सिनेमा येत होते.  खरं तर जस जसा तो वयाने वाढत होता तस तशी त्याच्यातील संवेदनशीलता अधिका अधिक व्यापक होतानाचा प्रवास थक्क करणारा होता   ....! अगदी "कयामतसे क़यामत तक"  ते "पीके " पर्यन्त त्याने 
 स्वत :च्या अभिनय क्षमतेवर आणि समाजमनावरील विशिष्ट संस्कारांवरही अतिशय प्रभावी असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला   ....!  कधी तो या प्रयोगात "तारें जमीं पर " "थ्री ईडियट्स" या सारख्या चित्रपटातील भाष्यातून कमालीचा यशस्वी होतानाही पाहिले तर कधी "पीके" सारख्या चित्रपटातून थोड़ा अयशस्वी, गोंधळलेलाही दिसला ! "सत्यमेव जयते "  या कार्यक्रमातून त्याने भारतातील  राजकीय, सामाजिक, कौटुंबिक एकूण सर्वच स्तरावरील प्रश्नांना वाचा फोडून भारतीय जनते समोर अनेक गोष्टी उघड केल्या , त्यावर चर्चा घडवून आणल्या आणि जनतेच्या सक्रीय सहभागातून अनेक प्रश्नांची उत्तरे   मिळवण्याचा प्रयत्नही केला  ...! त्यावेळी तर मला आमिर खान बद्दलचा अभिमान अधिकच वाढला ! प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मला  एक गोष्ट मनाला समाधान देऊन जायची  की , हा माणूस केवळ एक्टर नाही , हा हौस  म्हणून सिनेमा करीत नाही  किंवा केवळ पैसा कमावणे हाच याचा उद्देश नाही तर एक भारतीय म्हणून , एक जबाबदार नागरिक म्हणून.,
एक सजग संवेदनशील माणूस म्हणून समाजप्रती आपली जबाबदारी स्वीकारुन या माध्यमातून तो देशसेवा करीत आहे   ..! समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहे !   आपल्या देशवासियांना प्रतिकूल परिस्थितिशी 
लढण्यासाठी स्वत:सोबत समाजातील सर्वच घटकांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील एकीची शक्ति जागृत करून  हा "सेक्युलर" भारताला बळकट करण्याचे किती महत्वाचे कार्य अगदी विचारपूर्वक करीत आहे  ...! 

     आणि एका क्षणी मला " महात्मा गांधींचे " आभार मानावेसे वाटले   ...  हिन्दुस्थान  / पाकिस्तान  फाळणीच्या वेळी ज्या मुस्लिम बांधवांना  हिंदुस्थानच  आपली मातृभूमि आहे असे वाटते ते हिंदुस्थानात राहतील असे घोषित केले आणि म्हणून आज " आमिर खान " आपला आहे ! आमचा  " हिंदुस्थानी " आहे ! 

     पण  परवाच्या त्याच्या वक्तव्याने मात्र  मी चकित झाले   ....!! भारतात असहिष्णुता वाढत आहे ! माझ्या पत्नीला आमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते ! तिने मला देश सोडण्याबाबतचा विचारही  बोलून दाखवला ! हे आमिर खान बोलू शकतो ह्या वर विश्वास ठेवणे माझ्यासाठी कठीण  होते ! कारण मिडिया ध चा मा करण्यात पेशवेकालीन आनंदीबाईंचा सीक्वेल आहे   !! 

     भारतातील असहिष्णुता वाढत आहे   ... म्हणजे भाजप सरकार हे हिंदू प्रणीत सरकार आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे असे म्हणायचे आहे का ?  मग कांग्रेस सरकारच्या काळातील मुंबईतील केवळ मुस्लिम समुदयाने केलेली दंगल आणि महिला पोलिसांचा केलेला विनयभंग  , केवळ  मुस्लिम मतपेटीवर डोळा ठेवुन कांग्रेसने अनेकदा मुस्लिमेतर समाजाची केलेली पिळवणूक , त्यावेळी सहिष्णुता कुणी दाखवली?  पण त्यावेळी तू काही असहिष्णुते बद्दल बोललेले मी ऐकले नाही!  मला वाटले , बरेच आहे तुझ्या सारख्या विवेकी माणसाने अश्या समाजाचा एक व्यक्ति म्हणून स्वत:ला का " पेश " करावे ?
तू  " न्यूट्रल " राहून आपले कार्य करतो आहे , किती महान !!

     तुझ्या पत्नीला तुमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते   ...  म्हणजे ? हिंदुस्थानात इतर मुले नाहीच का ? त्यांच्या भविष्याचा विचार तू करणार नाहीस ?  मग तारें जमींपर  सोडून देणार तू ? इतका आत्मकेंद्रित कधीपासून झालास ? ज्या हिंदुस्तान मध्ये तुझे भविष्य घडले जे आज सर्व जग पाहत आहे त्या हिन्दुस्ताना बद्दल तू असा कसा बोलू शकतोस ?  पाकिस्तानातील  मुलांचे भविष्य तुला माहित आहे ? नोबेल विजेति " मलाला" आज  पाकिस्तान सोडून अमेरिकेत आहे !  का ? ती  तर तिच्याच मातृभुमित पाकिस्तानात नकोशी आहे ! का ? एका  मुस्लिम राष्ट्रात एक सुधारणावादी , पुरोगामी विचारांची मुस्लिम शाळकरी मुलगी नको  आहे ! का ? आणि तू म्हणतोस तुझ्या मुलाचे भविष्य धोक्यात आहे !!

     आणि सगळ्यात कहर म्हणजे तू पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणतोस तुझा देश सोडण्याचा विचार आहे!  तो तूच आहेस ना ? जो अतुल्य भारत म्हणत , सत्यमेव जयतेचा घोष करीत देशाच्या एकतेसाठी आणि एकूणच देशाच्या प्रतिमेला अधिका अधिक उज्वल प्रकाशमान करण्याची ग्वाही देतोस ! आणि आज तू सगळ्या समस्यांपासून पळ कसा काढतोस ? तुझा तुझ्यावरील विश्वास उडाला आहे की तुझ्या मातृभूमीवरील ? तुझ्या अश्या विधानांमुळे तू आपल्या मातृभूमीचा , आम्हा सर्व भारतीयांचा अपमान केला आहेस !

     तुला जर खरच असे असुरक्षित वाटत होते तर आपल्या भारतीय बांधवांशी मोठ्या विश्वासाने संवाद साधू का नाही शकलास ? तू संवाद साधलास पण चुकीचा,संशयास्पद सर्व भारतीयांना गृहीत धरून आणि अतिशय बेजबाबदारपणे !तिथे  " सरफ़रोश " मधील ACP अजयसिंघ राठोड  कुठेच दिसला नाही ! " लगान " मधला भुवनला तू कसा विसरलास ? आम्ही तर त्याला आमच्यात जगवण्याचा प्रयत्न करीत आहोत   ...! आणि तूच आता अश्या आपल्याच शिलालेखांना  उध्वस्त करीत चालला आहेस ?  तुझा प्रवास प्रकाशाकडून अंधाराकडे होत आहे !!

      प्रिय आमिर " तुझसे नाराज नहीं  ..... मगर हैरान हूँ   ...!!"



                                                                                         " समिधा "




     

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......