" माझे बाईपण "...................




कवयित्री पदमा गोळे यांची एक कविता वाचनात आली....! "आजच्या इतकी आईपणाची भीती वाटली नव्हती. अगतिकतेची खंत कधीच दाटली नव्हती" ....!  कवितेतील या काही ओळी वाचताना आजही  स्री आणि तिची भीती यांचा संदर्भ बदललेला नाही ....! दिल्लीतील आणि त्यानंतर सातत्याने स्रीयांवरील अत्याचारांच्या घटना आपण वाचतोच आहोत.  ज्या स्रीयांवर  हे अमानुष अत्याचार झालेत त्यांच्या दुख:वेदनांशी आपण कल्पनेतही भिडू शकत नाही....! आपला सामाज स्रीयांबाबत एव्हढा असंदेनशील कसा राहू शकतो?
अनादी -अनंत काळापासून कधी द्रौपदीच्या रुपात विटंबना तर कधी सीतेच्या  रुपात स्री पवित्र्याच्या सत्वपरीक्षेचे आव्हान अश्या    विकृत समाजपुरुषाच्या   मानसिकतेचे स्वरूप पहायला मिळते ....! आणि आजही हि विकृत समाजपुरुषाची  मानसिकता बदलेली नाही ..!
स्री पुरुष विषमता हा एक व्यापक विषमतेच्या वास्तवा मधला सर्वव्यापी घटक आहे. यापलीकडे विषमता पेरणारे घटक आहेतच धर्म , जात शिक्षण पैसा असे अनेकविध घटक आहेत. आणि प्रत्येक घटकातहि आपल्या परीने आहे रे नाही रे , थोडे वरचे  आणि थोडे खालचे स्तर आहेत या प्रत्येक स्तरावर स्रीयाना संघर्ष करावाच लागतो....! स्री  दुर्बल आहे...! असे फक्त समाजपुरुष ओरडतो ...! आजची स्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषी मक्तेदारी असलेल्याही प्रत्येक क्षेत्रात  कार्यरत आहे...!  परंतु तरीही स्रियांचा त्यांच्या मतांचा , त्यांच्या विचारांचा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा किती विचार केला जातो....? 
आजच्या २१ व्या शतकातही स्रीयांपुढे  स्रीभ्रून हत्या ,हुंडाबळी, लैंगिक शोषण, घरात- बाहेर मानसिक,शाररीक अत्याचार या आणि अश्या अनेक समस्या उभ्या आहेत...! ग्रामीण भागातील स्री तर आपल्या हक्कांबाबत अनभिज्ञ आहे . कर्त्या पुरुषाच्या बरोबरीने ती कष्ट करते पण तरीही तिला आर्थिक स्वातंत्र्य नाही...! निर्णय स्वातंत्र्य नाही...! तिला तिच्या मुलभूत गरजापासून वंचित ठेवले जाते..!

हि परिस्थिती बदलणे गरजेचे आहे....! या साठी सनातन भारतीय संस्कृतीचे पालक सांगतील मग स्रियांनी ७ च्या आत घरात यावे...! पूर्ण  कपडे घालावेत..! फक्त चूल आणि मुल सांभाळावे......! तर हे सर्व थोतांड आहे.....! बलात्कार करताना ती लहान मुलगी आहे कि म्हातारी स्री  आहे  हे बघितले  जाते का ...? तिचे वय ...तिचे कपडे या नगण्य गोष्टी आहेत..!  तिचे फक्त बाईपण बघितले  जाते ...! तेंव्हा  कुठे जाते तुमचे संस्कृती..? 
 मुळात संपूर्ण समाज्पुरुशाची विकृत मानसिकताच बदलली पाहिजे. स्रीला माणूस म्हणून वागवा ..! बरोबरीने तिचा सन्मान करा ...! कारण स्री -पुरुष हे समाजाची केवळ दोन चाके नाहीत , तर निसर्गाची दोन सूत्र आहेत ज्यावर समस्त मनुष्यजातीचे अस्तित्व अवलंबून आहे...!  आणि याचे भान समाजपुरुषाला येणे आवश्यक आहे...! विकृत समाजापेक्षा सुसंस्कृत समाज निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी पाश्च्चात्य संस्कृतीच्या नावाने जे अंधानुकरण चालले आहे या
बाबत ओरड होते.. हे काहींअंशी खरे असले तरी आपली भारतीय संस्कृतीचे डोळस भान ठेवून पुरुषी मानसिकता आणि त्याहूनही विकृत मानसिकता बदलली पाहिजे....! 

माझं  बाईपण बघा ...
पण 
मी जोजविते विश्वाला ....
माझं आईपणही बघा ....!!!! 


                                               "समिधा" 

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......