"देवाशी भांडण"

"देवाशी भांडण" या लेखावरिल वरील आपले विचार  काही पातळी वर समर्थनीय वाटतात  तर काही पातळीवर मनाला पटत  नाहीत .
     एक म्हणजे "देवाशी भांडण" करणारी स्त्री ही पुरुष प्रधान समाजरचनेला शरण गेलेली पापभिरू स्त्री वाटते .किंवा कदाचित ती  खरोखरच दुस-याच्या उद्धारात आपला उद्धार आहे असे समजुन उमजुन 'सवत ' घरात आणून स्वत:च्या स्वत्वाला मिटवून 'मोठ्या हृदयाची  म्हणून त्यागमूर्ति झालेली 'निष्ठावान स्त्री असावी असे वाटते .
    पण दूसरी आजची आधुनिक बुद्धिवादी स्त्री मला अधिक खरी वाटते  .  कारण ती  तिच्यातील स्वत्वाशी      ख-या अर्थाने निष्ठावान आहे , त्यामुले ती  पुरुषी समाज रचनेला शरण जात नाही की त्याग मूर्ति हो सार्थक्यही मिळवत नाही .ती आपली निष्ठा डोळसपणे जागवते/जगवते  म्हणून कोणतीही सजग आधुनिक स्त्री जेंव्हा तिला  कळते की , आपला नवरा आपल्याला मूल देऊ शकत नाही तेंव्हा ती आधुनिक बुद्धिवादी 
स्त्री डोळसपणे परिस्थितीचा स्वीकार करते 'त्याचा ती त्याग करत नाही तर उपलब्ध सर्व उपचार उपायांचा अगदी 'दत्तक ' घेण्याचाही निर्णय घेण्यास तयार असते . पण जर याच्या  उलट परिस्थिति असेल तर ...?पुरुष काय करेल , जरी त्याची मूल्य, निष्ठां कितीही घट्ट असले तरी परिस्थितीला मुरड  घालणार नाही .... तो  मुल्याना त्याच्या निष्ठेला मुरड  घालेल ....! (म्हणजेच स्वत:ची समाज मान्य सोय पाहील )
    त्यामुले आजच्या आधुनिक बुद्धिवादी स्त्रीचे वागणे व तिची  बदलाणारी मूल्य ही तिच्या ठायी बदलत      असणा-या  सक्षमतेचे प्रतिक आहे असे वाटते .....!
     एकुणच जगण्याच्या मुल्यांचा विचार केला तर जसे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे . मग मानवी मूल्य काळाप्रमाणे बदलणारच .....त्यांच्यातही परिवर्तन घडणारच (कारण आज परिस्थितीला मुरड  घालण्यापेक्षा मुल्यांना मुरड घालणे अधिक सोपे झाले आहे )
     मुल्यां बाबत अधिक व्यापक विचार केला तर "जेंव्हा मूल्य ही मानवी जीवनाची वृत्ति बनते  तेंव्हा मानव स्वत:पासून मुक्त होउन सर्वांशात जाउन मिळतो    ....! अर्थात मुल्य आपला आत्मशोध आहे जो परमात्म्याशी जाउन मिळण्याची शक्ति आहे ऊर्जा आहे .  आणि अशी ऊर्जा स्वत:पार होउन इतरांच्या ठायी आनंद देण्यास आपल्याला उद्युक्त करते  ...! आणि म्हणुनच 'आनंद ' चित्रपटातील 'आनंद' मला खरा वाटतो ....!
        थोडक्यात   आजची परिवर्तनशील मूल्य आजच्या जगण्यासाठीची गरज असेल व "जगण्याशी प्रमाणिक असतील" तर ती  लेखन आणि प्रत्यक्ष जगण या दोन्ही स्तरांवर स्विकारावीच लागतात ….!


                                                                                                    "  समिधा "



लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......